पंढरपुरातील उत्पात संपला!
November 16, 2006 at 2:27 pm | In Uncategorized | Leave a Commentनुकताच उच्च न्यायालयाचा एक निर्णय आला आहे. पंढरपूरच्या विट्ठल रुख्मिणी संस्थानावरील बडवे आणि उत्पात यांचे वर्चस्व या निर्णयाद्वारा संपुष्टात आले आहे.उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वारकरी समुदायामध्ये चैतन्याची एक लहर निर्माण झाली आहे.
आषाढी कार्तिकीला महाराष्ट्राभरातील वारकरी समाज त्यांच्या लाडक्या विठुरायाला भेटायला जात असतो. शेकडो मैल पायी चालून जाणारे हे लोक जेव्हा पंढरीत पोहचतात तेव्हा त्यांना काय दिसते, तर त्यांचा लाडका विट्ठल बडव्यांच्या आणि उत्पांतांच्या नज़रकैदेत अडकला आहे. शेकडो मैल जोषात चालणारे पाय शेवटच्या काही पावलांना पार करू शकत नाही,बडव्यांच्या तिजोरीत भर घालेपर्यंत विठुही दर्शन देत नव्हता म्हणे! आता मात्र उच्च न्यायालयाने हा उत्पात संपवलाय.पुढे सर्वोच्च न्यायालय, स्टे ई प्रकार होतीलच तरीही निदान काही दिवस तर विठुरायाला मोकळा श्वास घेता येईल.
न्यायालयाने विठ्ठलाला १९७३ मध्येच मोकळं केलं होतं,पण सुखसुखी संपेल तो उत्पात कसला? तेव्हाही शेलारमामांच्या आंदोलनाची किंमत द्यावी लागली होती. आणि आता कुठल्याही किमतीवर विठ्ठलाला पुन्हा कैदेत जाण्यापासून वाचवायला त्याचा ‘वार’करी समाज पुर्णांशाने समर्थ आहे.
“आम्ही काय गुलाम आहोत?”
October 1, 2006 at 7:08 am | In Uncategorized | 3 Commentsसहज दीक्षाभूमीसमोर फिरत होतो. एका स्टॉलवर जिजाई प्रकाशनाची बरीच पुस्तके दिसली. श्रीमंत कोकाट्यांचं ‘खरा शिक्षकदिन-२८ नोव्हेंबर’; पुरुषोत्तम खेडेकरांचं ‘आरक्षण वाढवा,देश वाचवा’; चंद्रशेखर शिखरे सरांचं ‘प्रतिइतिहास’ आणखी खूप काही! आपल्या घरची माणसं भेटल्यासारखं वाटलं. आणि जी माणसं स्टॉल चालवत होती त्याच्याशी दोन गोष्टी कराव्याश्या वाटल्या. अशी पुस्तकं विकणारी माणसं सहसा धंदेवाईक प्रकाशक नसतात.तर आपला विचार समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहचावा एवढ्याचसाठी न नफा न तोटा या तत्त्वावर काम करणारी जागरूक माणसं असतात हा माझा वैयक्तीक अनुभव!
दोघही प्राथमिक शिक्षक,दसऱ्याच्या दोन दिवसांच्या सुटीचा फायदा घेत विचार पसरवायला निघाली होती.थोड्याश्या ओळखीनंतर घरगुती गोष्टी सुरू झाल्या. सरांनी त्यांच्या तिसरीतल्या मुलाची एक गोष्ट सांगितली-
शेजाऱ्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा. मुलांना प्रसाद घ्यायला बोलवण्यासाठी त्यांच्याकडून कुणी बाई आली. अन् मुलाला म्हटलं-
“चल रे प्रसाद घ्यायला!”
“नाही येणार.”
“का?”
“आम्ही काय गुलाम आहोत?”
ते उत्तर ऐकून मीच एवढा थक्क झालो तर त्या बाईचं काय झालं असेल विचारच करायला नको.
फक्त ८-९ वर्षांची मुलं, पण त्यांनाही कळतं- सत्यनारायण, गणपती, घटस्थापना ही गुलामगिरी आहे. हे ज्यांना अजुनही कळत नाही त्यांनी काहीतरी या मुलांपासून शिकायला हवं.
मला बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा आठवत होत्या-
१) मी ब्रह्म, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
२)मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
३)मी गौरी गणपती किंवा हिंदू धर्मातील कुठल्याही देवतेला देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही.
४)देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.
६)बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा प्रचार खोटा आणि खोडसाळ आहे अहे मी मानतो.
मी एकेक प्रतिज्ञा आठवत होतो. मी मनातल्या मनात स्वतःला गौरवान्वित feel करत होतो.
“आम्ही काय गुलाम आहोत?”
अशी पिढी घडली तर माझं बहुजन भारतात राहण्याचं स्वप्न माझ्या उतार वयापर्यंत तरी निश्चीतच पुर्ण होईल.
बुद्धयुगाची प्रतिकृती….
October 1, 2006 at 6:11 am | In Uncategorized | Leave a Comment दि.३० सप्टेंबर २००६…..
स्थळ- पवित्र दीक्षाभूमी, नागपूर
दुपारची वेळ. हजारो कषाय वस्त्रधारी उपासक शिस्तीत उभे. पुज्य भदन्त सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली आठ हजार उपासकांनी श्रामणेर दीक्षा ग्रहण केली. रस्त्यांवर जिकडे तिकडे चिवरधारी श्रामणेर दिसतायत,जणू काही मी बुद्धकाळात राहत आहे.आता कुठून तरी स्वतः भगवान बुद्ध येतील आणि धम्मदेसना करतील असं वाटतंय,इतकं जिवंत वातावरण आहे.
तिकडे लक्ष्मण माने, ऍड.एकनाथराव आव्हाड यांचाही दीक्षाविधी पवित्र दीक्षाभूमीवर पार पडलाय. त्यांच्या मागोमाग विमुक्त भटक्या जमाती आणि मातंग समाजातील आमचे भाईबांधव बुद्धाच्या सद्धम्मात प्रवेश करत आहेत.
संपुर्ण भारत बुद्धमय करण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न होतं,ते स्वप्न दृष्टीपथात येतंय. अजून ते अजून थोडं दूर असेल पण आम्ही त्या युगाच्या हाका ऐकतोय. मी नागपुरात बुद्ध युगाची प्रतिकृती पाहत आहे. मला माहित आहे त्यांच्या हृदया धडकी भरल्याशिवाय राहणार नाही .
पाठ
July 29, 2006 at 10:23 am | In Uncategorized | Leave a Commentसोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले?
खातरी झाली न त्याची.. ते घरी डोकावले!
हा कसा झिम्मा विजांशी ओठ माझे खेळती..
कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले?
ऐकली आजन्म त्यांची मी शिळी रामायणे
(शेवटी मी बोललो अन् ते किती रागावले!)
मी न स्वप्नांचे कधीही मान्य केले मागणे
दुःख माझे एकट्याचे मी कधी लाडावले?
वना रे, एकदाही मी न टाहो फोडला
पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पाणावले!
वेचण्या जेव्हा निघालो माणसांची आसवे
माझियामागे भिकारी शब्द सारे धावले!
वार झेलायास केली मी खुली छाती जरी
नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले!
कोलंबसाचे गर्वगीत
July 15, 2006 at 12:44 pm | In Uncategorized | Leave a Commentकोलंबसाचे गर्वगीत हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या, समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशाकोन सारे
ताम्रसुरा प्राशून मातू दे दैत्य नभामधले, दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही, दुभंग धरणीला कराया, पाजळू दे पलिता
की स्वर्गातून कोसळलेला, सूडसमाधान मिळाया, प्रमत्त सैतान
जमवूनी मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान
पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे, फुटू दे नभ माथ्यावरती
आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविका ना कुठली भीती
सहकाऱ्यांनो, का ही खंत, जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम
काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहून घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा?
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती, जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नव क्षितिजे पुढती
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा, घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला!”
– कुसुमाग्रज
कोलंबसाचे गर्वगीत
July 15, 2006 at 12:44 pm | In Uncategorized | Leave a Commentकोलंबसाचे गर्वगीत हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे प्रतिध्वनीने त्या, समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशाकोन सारे
ताम्रसुरा प्राशून मातू दे दैत्य नभामधले, दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही, दुभंग धरणीला कराया, पाजळू दे पलिता
की स्वर्गातून कोसळलेला, सूडसमाधान मिळाया, प्रमत्त सैतान
जमवूनी मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान
पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे, फुटू दे नभ माथ्यावरती
आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविका ना कुठली भीती
सहकाऱ्यांनो, का ही खंत, जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम
काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहून घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा?
कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन मरती, जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली, निर्मितो नव क्षितिजे पुढती
मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा, घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला!”
– कुसुमाग्रज
सांभाळ बा विठू
July 15, 2006 at 9:46 am | In Uncategorized | Leave a Commentबडव्यांचा ताबा, तुझेवरी 1
शिनला पुंड्लिक चेपुनिया पाय
गेले बाप माय, वृद्धाश्रमी 2
विसरली जनी, दळण कांडण
घालते रांधण, मोलकरी 3
सावताही गेला सोडुनिया मळा
लागलासे लळा, नगराचा 4
गेले नामा तुका, संतकर्मयोगी
उरलेले भोगी, लुटायाशी 5
धुवोनिया पाप विटाळली भीमा
उल्लघली सीमा अन्यायाची 6
धूप दीप आर्त्या टाळ्यांचा गजर
अखंद जागर मंबाजीचा 7
सांभाळ बा विठू डोईचा किरीट
कडी घाल नीट, गाभाऱ्याची 8
हरीभाऊ गिरपुंजे, वर्धा
सांभाळ बा विठू
July 15, 2006 at 9:46 am | In Uncategorized | Leave a Commentबडव्यांचा ताबा, तुझेवरी 1
शिनला पुंड्लिक चेपुनिया पाय
गेले बाप माय, वृद्धाश्रमी 2
विसरली जनी, दळण कांडण
घालते रांधण, मोलकरी 3
सावताही गेला सोडुनिया मळा
लागलासे लळा, नगराचा 4
गेले नामा तुका, संतकर्मयोगी
उरलेले भोगी, लुटायाशी 5
धुवोनिया पाप विटाळली भीमा
उल्लघली सीमा अन्यायाची 6
धूप दीप आर्त्या टाळ्यांचा गजर
अखंद जागर मंबाजीचा 7
सांभाळ बा विठू डोईचा किरीट
कडी घाल नीट, गाभाऱ्याची 8
हरीभाऊ गिरपुंजे, वर्धा
औदुंबर
July 5, 2006 at 9:38 am | In Uncategorized | Leave a Commentऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट्लागली हिरवी गरदी पुढें
पायवाट पांढरी तयांतुनी अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाक्कुनी जळात बसला असला औदुंबर .
बालकवी
औदुंबर
July 5, 2006 at 9:38 am | In Uncategorized | Leave a Commentऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे;
शेतमळ्यांची दाट्लागली हिरवी गरदी पुढें
पायवाट पांढरी तयांतुनी अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाक्कुनी जळात बसला असला औदुंबर .
बालकवी
Blog at WordPress.com. | Theme: Pool by Borja Fernandez.
Entries and comments feeds.
